Vivek Vichar - विवेक विचार - जानेवारी 2017
Marathi | 52 pages | True PDF | 20.3 MB
Marathi | 52 pages | True PDF | 20.3 MB
विवेक विचार मासिकाचा हा अंक 'समर्थ भारत पर्व'वर आधारित आहे. या ठिकाणी अंकातील संपादकीय देत आहे… यावरून अंकाचे स्वरूप स्पष्ट होईल…
+=+=+= संपादकीय : जनवरी २०१७ =+=+=+
गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती. जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद. १२ जानेवारी ही स्वामीजींची जयंती.
….
सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. सकारात्मक विचारामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्चितीही करता आली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘एखादे ध्येय निश्चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल, तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो.’ तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते.
Read More at http://vivekvichar.vkendra.org/2017/01/january-2017.html