Vivek Vichar - विवेक विचार - एप्रिल 2017

Posted By: Pulitzer

Vivek Vichar - विवेक विचार - एप्रिल 2017
Marathi | 52 pages | True PDF | 8.3 MB


संपादकीय । विवेक विचार । एप्रिल २०१७

मागील 1200 वर्षांपासून भारतीय मनाला छळणारा एक प्रश्‍न आजही कायम आहे. 1947 ला तेव्हा देशाच्या नेतृत्वस्थानी असलेल्या हिंदू नेत्यांना वाटले, ‘मुस्लिमांसाठी वेगळी भूमी देऊ, त्यामुळे या प्रश्‍नातून सुटका होईल.’ त्यासाठी काकडी कापावी इतक्या सहजतेने मातृभूमीचे तुकडे पाडले गेले. त्यानंतरही लक्षावधी निष्पाप देशवासीयांची कत्तल रोखणे शक्य झाले नाही. लाखोंना आपल्याच भूमीतून परागंदा व्हावे लागले. अगणित लोकांना निर्वासिताचे जगणे नशिबी आले. प्रश्‍न जसाच्या तसा राहिला.

भारतीयांनी जिहादी मानसिकता कधीच समजून घेतली नाही. ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांची अक्षम्य अवहेलना करण्यात आली. परिणामी, उर्वरित खंडित भारतातही जिहादी फुटिरता कायम राहिली. वाढत गेली. पश्‍चिम बंगाल, आसाम, केरळसारख्या अनेक राज्यांमध्ये हिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागली आहे. काही ठिकाणी 2 टक्के तर काही ठिकाणी 18 ते 20 टक्क्यांनी फरक झाला आहे. आजही काही मुस्लिमबहुल ठिकाणी निर्वासित होण्याची वेळ हिंदू कुटुंबांवर येत आहे.

आता जनतेत हळूहळू जागृती होत आहे. आव्हानाचे स्वरूप पाहता ती खूपच तोकडी आहे. या पार्श्‍वभूमीवर बीबीसीचे माजी पत्रकार, विचारवंत आणि ओपन सोर्स इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. तुफेल अहमद यांची लेखमाला विवेक विचारच्या वाचकांसाठी सुरू करत आहोत. या लेखांमधून लेखकाने या देशाला दीर्घकाळ छळणार्‍या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येईल.